कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच...पाच बंधारे पाण्याखाली 

<p>कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच...पाच बंधारे पाण्याखाली </p>

कोल्हापूर – गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. या वाढत्या पावसामुळे जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. आज दुपारी १२ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी १५ फुट १ इंच होती.