पुरामुळे आळंदीतील जनजीवन विस्कळीत ; यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत न येण्याचे समितीचे आवाहन 

<p>पुरामुळे आळंदीतील जनजीवन विस्कळीत ; यंदा पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत न येण्याचे समितीचे आवाहन </p>

पुणे – इंद्रायणी नदीला पूर आल्याने आळंदीतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच आळंदीतील वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होणार नसल्याचे ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीने म्हटले आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा अत्यंत मर्यादित स्वरूपात होणार असल्याचे समितीने म्हटले आहे.

उद्या ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरूपात सुरु होणार आहे. या सोहळ्यास केवळ परंपरेनुसार आवश्यक असलेल्या दिंड्यांचे प्रतिनिधी, मानकरी, सेवेकरी आणि निमंत्रित मिळून सुमारे १ हजार ६६० व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच समितीच्यावतीने सर्व वारकरी भाविकांना पाऊस आणि नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन यंदा आळंदीत न येण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील मुक्कामी पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असेही समितीने म्हटले आहे.