अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा 

<p>अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा </p>

मुंबई – राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेवून घोषणा केली. 

राज्यात १ कोटी ४३ लाख ५२ हजार हेक्टर जमिनीवर लागवड झाली होती. त्यापैकी ६८ लाख ७९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालं आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी मदत करत आहोत, त्यामध्ये २९ जिल्हे, २५३ तालुके आणि २०५९ मंडळांचा समावेश आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

 - अंशत: पडझड झालेल्या घरांनाही मदत
- दुकानांचं नुकसान झालंय. ५० हजारांपर्यंतची मदत केली जाईल
- दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत प्रती जनावर मदत
- एनडीआरएफमधील तीन जनावरांची मर्यादा काढली आहे.
- ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये प्रतिजनावर
- कोंबड्यांसाठी १०० रुपये प्रतिकोंबडी मदत दिली जाईल
- खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७ हजार रुपये हेक्टरी रोख आणि ३ लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिले जातील.
- बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून ३० हजार रुपये प्रतिविहीर दिले जातील.
- पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटींची तरतूद.
- दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची वसुली, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा सर्व गोष्टी लागू केल्या आहेत.
- पीक नुकसान भरपाईसाठी ६५ लाख हेक्टर जमिनीसाठी ६१७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय
- रबीच्या पिकासाठी प्रतिहेक्टरी अतिरिक्त १० हजार रुपये दिले जातील.
- एकूणमध्ये कोरडवाहूसाठी हेक्टरी १८ हजार ५००, हंगामी बागायतीला २७ हजार तर बागायती शेतकऱ्याला ३२ हजार ५०० रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय
- ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. त्यांना वरील मदतीव्यतिरिक्त पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारण १७ हजार हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील.
- राज्य सरकारच्य वतीने नुकसान भरपाईसाठी एकूण ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज दिलं जात आहे, अशा मोठ्या पॅकेजची घोषणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.