उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने देशाने एक चांगले नेतृत्व गमावलं : माजी आमदार ऋतुराज पाटील

<p>उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने देशाने एक चांगले नेतृत्व गमावलं : माजी आमदार ऋतुराज पाटील</p>

कोल्हापूर - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज माजी आमदार ऋतुराज पाटील यांची सकाळी वसगडे येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन केले होते. बैठक सुरु असतानाच अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली.

 माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धाजंली अर्पण केली. महाराष्ट्र आणि देशाने एक चांगले नेतृत्व गमावले, अशा भावना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचा आजचा प्रचार दौरा रद्द केला आहे.