येत्या मार्चमध्ये राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार...

राज्यातील ‘या’ नेत्यांचा कार्यकाळ संपणार 

<p>येत्या मार्चमध्ये राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार...</p>

नवी दिल्ली – येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतील  काही सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यासाठी देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मार्चमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये सर्वाधिक ७ जागा या महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता नेता आपलं नशीब आजमावणार हे पहावे लागणार आहे.  शरद पवार, रामदास आठवले,  फौजिया खान,रजनी पाटील, प्रियांका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, भागवत कराड यांचा राज्यसभेवरील कार्यकाळ संपत आला आहे. 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होवून निकाल जाहीर केला जाईल.

या निवडणुकीत विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्जांमुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.