त्या 26 कुटुंबांबद्दल काही कर्तव्य नाही का? : पहलगाम हल्ल्यातील पीडित पत्नीचा सवाल

मुंबई – उद्या भारत पाकिस्तानचा सामना होणार आहे. पाकिस्तान भारतावर सातत्याने दहशतवादी हल्ला करत असतो त्यात पहलगाम हल्ला ताजा असताना या सामन्याला सरकारने परवानगी कशी दिली असा सवाल उपस्थित होत आहे यावर पहलगाम हल्ल्यातील पीडित पत्नीने सवाल उपस्थित केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडित पत्नी ऐशान्या द्विवेदी यांनी सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. लोकांनी टीव्हीवर हा सामना पाहू नये असं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.
ऐशान्या द्विवेदी यांनी म्हटलं आहे की, "बीसीसीआयने भारत आणि पाकिस्तानमधील सामना स्वीकारायला नको होता. मला वाटतं बीसीसीआय त्या 26 कुटुंबांबद्दल भावनिक नाही. ते पहलगाममधील हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर विसरले आहेत. मी आपल्या क्रिकेटपटूंना हे देखील विचारू इच्छितो की, ते असे का करत आहेत? त्यांनी पाकिस्तानी संघासोबत खेळण्यास का होकार दिला?'
"क्रिकेटपटू देशभक्त असतात असं म्हटलं जातं. देशभक्तीच्या भावनेमुळेच राष्ट्रीय खेळ हॉकीपेक्षा जास्त लोकांना क्रिकेट पाहणं आणि खेळणं आवडते. पण 1-2 क्रिकेटपटू वगळता कोणीही पुढे येऊन पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा असं म्हटलं नाही. बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या धाकावर खेळण्यास भाग पाडू शकत नाही. त्यांनी त्यांच्या देशासाठी उभे राहिले पाहिजे. पण ते तसे करत नाहीत. मी सामन्याच्या प्रायोजकांना आणि प्रसारकांना विचारू इच्छितो की त्यांचे त्या 26 कुटुंबांबद्दल काही कर्तव्य नाही का?", असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.