मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत न्यायालयाचा धक्कादायक निकाल

मुंबई – तब्बल १७ वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या निकालाने सर्वांना धक्का बसला आहे.
सबळ पुरावे नाहीत तसेच केवळ संशयावरून कोणाला दोषी ठरवता येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. बॉम्बस्फोटात जे जखमी झालेत किंवा मृत्यू झालेत ते बॉम्ब स्फोटामुळेच झाले आहेत हे सरकारी पक्ष सिद्ध करु शकला आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. मात्र स्फोटाच्या ठिकाणी सापडलेल्या दुचाकीमध्ये आरडीएक्स लावण्यात आले होते हे सरकारी वकिलांना सिद्ध करता आले नाही. मा्त्र बाईक प्रज्ञासिंह ठाकूरची होती, याचा कोणाताही पुरावा सापडला नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.