"एक दिवस, माझ्या बळीराजासाठी" अभियानांतर्ग पालकमंत्री प्रकाश आबिटकर शेतीच्या बांधावर
टिलरद्वारे चिखलगुट्टा (मशागत) करुन वाफ्यामध्ये केली भात रोपांची लागण
कोल्हापूर - मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत "एक दिवस, माझ्या बळीराजासाठी" उपक्रमांतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी मधील शेतात जाऊन पावर टिलरद्वारे चिखलगुट्टा (मशागत) करुन वाफ्यामध्ये भात रोपांची लागण केली. यावेळी बांधावर बसून झुणका भाकरी खाताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडी-अडचणी जाणून घेतल्या. नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी यापुढेही उपक्रम राबवण्यात येतील असे त्यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ३०० गावमध्ये कार्यक्रमात संपन्न झाला.
यावेळी राधानगरी- कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, तहसीलदार अनिता देशमुख तसेच कृषी, महसूल व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.