विशाळगड प्रकरणी धार्मिक रंग देऊन राजकारणाचा प्रयत्न करणाऱ्यांना सुज्ञ जनतेने थारा देऊ नये-संभाजीराजे

21 July 2024, 09:11:16 PM Share
कोल्हापूर - विशाळगडा प्रकरणी धार्मिक रंग देऊन राजकारणाचा प्रयत्न करणाऱ्यांना सुज्ञ जनतेने थारा देऊ नये, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी "विशाळगड : कथ्य आणि तथ्य" या लेखातून आवाहन केलंय.

संभाजीराजे छत्रपती यांनी "विशाळगड : कथ्य आणि तथ्य" या लेखातून लिहतात कि, "गडकोटांविषयी मला लहानपणापासूनच आवड निर्माण झाली. कॉलेज जीवनानंतर सामाजिक क्षेत्रात सक्रिय होत असताना सारखीच आवड जोपासणारी मंडळी सोबत आल्याने भावी जीवनात गडकोट संवर्धनावर कार्य करायचे हेच निश्चित केले. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून गडकोट संवर्धनाचा मुद्दा उचलून धरला. अनेक संस्थांच्या माध्यमातून गडकोट संवर्धनासाठी माझ्या परीने शक्य तितके अधिक प्रयत्न करत राहिलो. विशेषतः स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या राजधानी दुर्गराज रायगडचे जतन संवर्धन व्हावे, यासाठी प्रयत्नशील राहिलो. याचे फलित म्हणून २०१७ साली महाराष्ट्र शासनाने रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली व त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे दिली. या प्राधिकरण अंतर्गत दुर्गराज रायगडचे जतन संवर्धन व रायगड घेऱ्यातील २१ गावांची विकासात्मक जबाबदारी मी सध्या पार पाडत आहे. 

या व्यतिरिक्त, राज्यातील इतरही सर्व गडकोटांचे जतन संवर्धन व्हावे, यासाठीचे प्रयत्न मी सुरूच ठेवले आहेत. दोन वर्षांपूर्वी अनेक दुर्गप्रेमी व शिवभक्तांनी किल्ले विशाळगडावर झालेल्या बेसुमार अतिक्रमणांबाबत व्यथित होऊन अगदी अपेक्षेने माझ्याकडे धाव घेतली. या विषयावर संपूर्ण अभ्यास करून, गडास प्रत्यक्ष भेट देऊन मी सर्व पाहणी केली. गडावर अत्यंत विदारक परिस्थिती होती. शिवकालीन वास्तू अवशेषांवर केलेले बेसुमार अतिक्रमण, खुलेआम मद्यपान, जुगाराचे अड्डे, लॉजिंगचे व्यवसाय, कोंबड्या व बकऱ्यांचा खुला कत्तलखाना, संपूर्ण गडावर पसरलेली दुर्गंधी या गडाचा उज्ज्वल इतिहास विस्मरणात घालविण्यासाठी पुरेशी होती ! गडावरील हे भयाण दृश्य मनाला यातना पोहोचविणारे होते. आजपर्यंत आपले याकडे दुर्लक्ष कसे झाले, याचीच खंत वाटू लागली. 

या भेटीनंतर दि. ०७ डिसेंबर २०२२ रोजी मी जिल्हा प्रशासनासोबत बैठक बोलाविली. या बैठकीस जिल्हाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विशाळगड मुक्तीसाठी लढा देणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच गडावर अतिक्रमण केलेले स्थानिक उपस्थित होते. गडावर बेसुमार अतिक्रमण आहे हे सर्वांनीच मान्य केले. जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना गडावरील त्यांची अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासाठी कालमर्यादा दिली. या कालमर्यादेत त्यांनी त्यांची अतिक्रमणे स्वतःहून काढून न घेतल्यास जिल्हा प्रशासन पुढील तीन महिन्यांत संपूर्ण गड अतिक्रमण मुक्त करेल, अशी ग्वाही या बैठकीत दिली. तसेच, या बैठकीचे फलित म्हणजे गडावर पशूपक्षी हत्याबंदी लागू करून काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. या दिवशीच संध्याकाळी धडक कार्यवाही करत गड पायथ्याला असलेल्या वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात देखील झाली. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून दुसऱ्याच दिवशी ही कार्यवाही बंद पाडली. अतिक्रमण धारकांना त्यांची अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासाठी प्रशासनाने जी कालमर्यादा दिली होती, त्यामध्ये अतिक्रमणे मान्य असून सुद्धा ती काढून न घेता त्यांनी न्यायालयात धाव घेतली. स्थानिक लोकप्रतिनिधीचे या सर्वांना आतून पाठबळ होते व प्रशासनावर दबाव होता. जिल्हा प्रशासन बाजू मांडण्यास कमी पडले. साहजिकच न्यायालयाने अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती दिली. राजकीय दबावामुळे प्रशासनाने या याचिकेचा पाठपुरावाच केला नाही. परिणामी न्यायप्रविष्ठ विषय आहे या गोंडस नावाखाली दीड वर्षे भिजत घोंगडे राहिले. 

पुन्हा एकदा शिवभक्तांचा आक्रोश वाढू लागला. माहे जून २०२४ च्या अखेरीस विशाळगडमध्ये लक्ष घालण्यासाठी माझ्यावर पत्र, ईमेल्स, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमांतून भडिमार होऊ लागला. त्यामुळे पुन्हा एकदा या विषयात लक्ष घालून मी न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा अभ्यास केला. मोठी बाब निदर्शनास आली. न्यायालयाने केवळ सहा अतिक्रमणे काढण्यास स्थगिती दिली होती. प्रशासनाने दिशाभूल करत सर्वच अतिक्रमणांकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले होते. या दुर्लक्षास आणि न्यायप्रविष्ट विषय आहे हे भासाविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधीचा दबाव कारणीभूत होता, हे जगजाहीर झाले. यामुळे शिवभक्तांचा दबाव वाढवून न्यायप्रविष्ठ असलेली सहा अतिक्रमणे वगळता इतर सर्व अतिक्रमणे हटविली जावीत यासाठी ०७ जुलै २०२४ रोजी मी कोल्हापूर येथे शिवभक्तांची बैठक बोलावली. १२ जुलै १६६० रोजी किल्ले पन्हाळगडचा वेढा भेदून छत्रपती शिवाजी महाराज १३ जुलै रोजी विशाळगडवर पोहोचले होते. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून १३ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विशाळगडावर जाण्याचे निश्चित झाले. मात्र पुढे राज्यभरातील शिवभक्तांनीच मागणी केल्याने सर्वांच्या सोयीकरिता रविवारचा दिवस म्हणून १३ ऐवजी १४ जुलै ही तारीख ठरविण्यात आली. दरम्यानच्या सात दिवसांत प्रशासन अतिक्रमणे काढण्याचा ठोस निर्णय घेईल, असे वाटत होते. मात्र, बैठक लावण्याव्यतिरिक्त प्रशासनाने काहीही केले नाही. बैठकीत काहीच निष्पन्न होणार नाही, याची पूर्ण कल्पना व पूर्वानुभव असल्याने आणि ठोस निर्णय अपेक्षित असल्याने आम्ही या बैठकीवर जाहीर बहिष्कार टाकला. 

प्रशासनाने निराशा केली. आम्ही विशाळगडावर जाऊ नये यासाठी कोल्हापूरच्या खासदारांमार्फत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, अशी कोणतीही बैठक झाली नाही. 

१४ जुलै रोजी आम्ही विशाळगडाकडे निघालो. साधारणतः एक वाजता गडाच्या तीन किलोमीटर अलीकडील गजापूर येथून आम्ही गडाच्या दिशेने चालत निघालो. वाटेत काही घरांची व वाहनांची तोडफोड झाल्याचे दिसले. पोलिसांकडे चौकशी करताच समजले की सकाळीच मोठ्या जमावाने ही तोडफोड केलेली आहे. अधिक चौकशी केल्यावर समजले की सकाळी काही शिवभक्त गडावर गेले होते, त्यावेळी गडावरील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. जखमी अवस्थेत खाली आलेल्या शिवभक्तांना पाहून चिडलेल्या जमावाने गडाखाली असलेल्या वाडीत तोडफोड केली, असे आम्हाला सांगण्यात आले. यावेळी या वाडीतील स्थानिकांना काही हानी पोहोचली नसून कालच सर्व लोकांना इतरत्र हलविले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

तिथून आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. पायथ्याशी असणाऱ्या पुलावर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला रोखले. सकाळी घडलेल्या प्रकरणानंतर दक्षता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की, मुख्यमंत्र्यांशी बोलून ठोस निर्णय घेऊ, आपण आत्ता गडावर जाणे टाळावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही देखील गडावर जाण्याचा हट्ट टाळला. मात्र, या बदल्यात उद्यापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यास सुरुवात करावी, असा शब्द मागितला. सर्व शिवभक्तांना संयम ठेवून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याचे आवाहन केले. जवळपास तीन तास मुसळधार पावसात आम्ही सर्व शिवभक्तांसह गडपायथ्याला थांबून राहिलो. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. शेवटी शिवभक्तांच्या दबावापुढे सरकार व प्रशासन नमले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यापासून विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

स्वराज्याची शौर्यगाथा सांगणाऱ्या विशाळगडाला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करणे हेच आमचे ध्येय होते, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आणि सकाळी घडलेल्या प्रकरणानंतर दक्षता म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही गडपायथ्याला थांबूनच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि माघारी निघालो. स्वतः जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख या घटनाक्रमाचे साक्षीदार आहेत. 

दुसऱ्यादिवशी पासून राजकारणी मंडळी या विषयात राजकारण शोधू लागली. आपले अस्तित्त्व दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाला. काहीजण शिवभक्तांना दोष देऊ लागले. पण ज्या अतिक्रमण करणाऱ्यांमुळे हे सर्व घडले ते मात्र यांना निर्दोष वाटू लागले. कायदा हातात घेणाऱ्यांचे समर्थन मुळीच नाही पण अतिक्रमण करून कायदा मोडणाऱ्यांचे समर्थन कसे होऊ शकते ? कायदा मोडणाऱ्यांना कोणती शिक्षा आहे ? कायद्यानुसार अतिक्रमण काढा म्हणतात मग अतिक्रमण करताना कायदा आठवला नाही का ? गडावर बेसुमार अतिक्रमण होते, हे अतिक्रमण करणाऱ्यांसह सर्वांनाच मान्य आहे, मग प्रशासनाने दिलेल्या वेळेत स्वतःहून अतिक्रमण का काढून घेतले नाही ? ज्या नेत्यांना वाटते की कायदेशीरपणे अतिक्रमण काढले पाहिजे त्या नेत्यांनी आधीच गडावर जाऊन अतिक्रमण करणे हे बेकायदेशीर आहे आणि स्वतःहून ते काढून घ्यावे, असे प्रबोधन का केले नाही ? अतिक्रमण करून विशाळगड सारख्या ऐतिहासिक स्मारकाचे, देशाच्या इतिहासाचे नुकसान करणे हा गुन्हा नाही का ? हे प्रश्न या राजकारण्यांनी स्वतःला विचारून पहावेत. अतिक्रमण धारकांचा ज्यांना कळवळा येत आहे ते लोक गडावर शिवभक्तांवर झालेल्या हल्ल्याचा साधा उल्लेखही करत नाहीत, याचे वाईट वाटते. तसेच, स्थानिकांना आदल्या दिवशीच प्रशासनाने इतरत्र हलविले असताना आत्ता स्थानिक लोक शिवभक्तांवर जे आरोप करत आहेत, त्यामध्ये किती तथ्य असू शकते याचा वाचकांनीच विचार करावा.

हा विषय विशाळगडवरील अतिक्रमण पुरता मर्यादित आहे. याचे जे पडसाद उमटले त्याबाबत प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल. याला धार्मिक रंग देऊन राजकारण साधण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, तसेच असा प्रयत्न करणाऱ्यांना सुज्ञ जनतेने थारा देऊ नये, या अपेक्षेनेच हा लेखनप्रपंच !"

संबंधित लेख

मनोहर भरमा नांगरे यांचे मरणोत्तर नेत्रदान14 May 2025, 12:09:39 PM

महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश14 May 2025, 12:07:53 PM

महावितरण चे कार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात13 May 2025, 04:51:06 PM

रविवारी 18 मे रोजी अलमट्टी उंचीवाढ विरोधी "चक्काजाम आंदोलन" 13 May 2025, 04:48:31 PM

सर्कीट बेंच साठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- आ. सतेज पाटील12 May 2025, 04:39:48 PM

राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकादिन साजरा12 May 2025, 03:45:35 PM

कार्यकारी संचालक असणार पंचगंगा कारखान्याचा कारभारी: कारखान्यावर प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार12 May 2025, 02:54:28 PM


कार्यकारी संचालक असणार पंचगंगा कारखान्याचा कारभारी: कारखान्यावर प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार12 May 2025, 02:54:28 PM

महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी12 May 2025, 02:15:48 PM

भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी ९ जूनपासून सुरू12 May 2025, 01:07:33 PM

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार, तर एक महिला जखमी12 May 2025, 12:17:37 PM

मोटारसायकल अपघातात तबला वादक शिक्षक ठार12 May 2025, 02:26:39 AM

अलमटृी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात अंकलीपुलाजवळ सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन..... 11 May 2025, 04:00:21 PM

कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरवात; राजगड, पन्हाळा, रायगड, विशाळगड संघ विजयी11 May 2025, 03:56:50 PM


मलतवाडी इथं कारवाई करत बनावट मद्यसाठ्यासह सुमारे तीन लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त10 May 2025, 03:26:17 PM

प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांचं निधन10 May 2025, 01:39:10 PM

पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतीय लष्कराचं जशास तसं उत्तर10 May 2025, 01:30:08 PM

कंत्राटी वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू10 May 2025, 01:22:31 PM

जि.प. अंतर्गत सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रदद्; मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना10 May 2025, 12:11:19 PM

पाकिस्तानच्या हल्ल्यात राजौरीच्या अतिरिक्त जिल्हा आयुक्तांचा मृत्यू10 May 2025, 12:07:40 PM

पाकिस्तानवरील हल्ल्यावरून 'ऑपरेशन सिंदूर' पोस्टर रिलीज10 May 2025, 12:06:02 PM


गगनबावड्यात गोवा बनावटीची दारू जप्त, दोघेजण ताब्यात : गगनबावडा पोलिसांची कारवाई09 May 2025, 01:44:37 PM

शियेत बालसंस्कार शिबीर, वारकरी संमेलनाचे आयोजन; मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थ09 May 2025, 01:13:07 PM

ऑपरेशन सिंदूर - भारताचा पाकिस्तान वर 9 ठिकाणी हवाई हल्ला07 May 2025, 08:03:25 AM

राज्यात १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिलचे आयोजन06 May 2025, 11:13:26 PM

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जातीय जनगणनेबाबत पंतप्रधानांना तीन सूचना06 May 2025, 10:56:16 PM

बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या यात्री निवास वर कारवाई06 May 2025, 10:00:48 PM

लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील06 May 2025, 09:42:10 PM

टॅग्स

प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ

विशाळगड प्रकरणी धार्मिक रंग देऊन राजकारणाचा प्रयत्न करणाऱ्यांना सुज्ञ जनतेने थारा देऊ नये-संभाजीराजे

21 July 2024, 09:11:16 PM Share
कोल्हापूर - विशाळगडा प्रकरणी धार्मिक रंग देऊन राजकारणाचा प्रयत्न करणाऱ्यांना सुज्ञ जनतेने थारा देऊ नये, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी "विशाळगड : कथ्य आणि तथ्य" या लेखातून आवाहन केलंय.

संभाजीराजे छत्रपती यांनी "विशाळगड : कथ्य आणि तथ्य" या लेखातून लिहतात कि, "गडकोटांविषयी मला लहानपणापासूनच आवड निर्माण झाली. कॉलेज जीवनानंतर सामाजिक क्षेत्रात सक्रिय होत असताना सारखीच आवड जोपासणारी मंडळी सोबत आल्याने भावी जीवनात गडकोट संवर्धनावर कार्य करायचे हेच निश्चित केले. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून गडकोट संवर्धनाचा मुद्दा उचलून धरला. अनेक संस्थांच्या माध्यमातून गडकोट संवर्धनासाठी माझ्या परीने शक्य तितके अधिक प्रयत्न करत राहिलो. विशेषतः स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या राजधानी दुर्गराज रायगडचे जतन संवर्धन व्हावे, यासाठी प्रयत्नशील राहिलो. याचे फलित म्हणून २०१७ साली महाराष्ट्र शासनाने रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली व त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे दिली. या प्राधिकरण अंतर्गत दुर्गराज रायगडचे जतन संवर्धन व रायगड घेऱ्यातील २१ गावांची विकासात्मक जबाबदारी मी सध्या पार पाडत आहे. 

या व्यतिरिक्त, राज्यातील इतरही सर्व गडकोटांचे जतन संवर्धन व्हावे, यासाठीचे प्रयत्न मी सुरूच ठेवले आहेत. दोन वर्षांपूर्वी अनेक दुर्गप्रेमी व शिवभक्तांनी किल्ले विशाळगडावर झालेल्या बेसुमार अतिक्रमणांबाबत व्यथित होऊन अगदी अपेक्षेने माझ्याकडे धाव घेतली. या विषयावर संपूर्ण अभ्यास करून, गडास प्रत्यक्ष भेट देऊन मी सर्व पाहणी केली. गडावर अत्यंत विदारक परिस्थिती होती. शिवकालीन वास्तू अवशेषांवर केलेले बेसुमार अतिक्रमण, खुलेआम मद्यपान, जुगाराचे अड्डे, लॉजिंगचे व्यवसाय, कोंबड्या व बकऱ्यांचा खुला कत्तलखाना, संपूर्ण गडावर पसरलेली दुर्गंधी या गडाचा उज्ज्वल इतिहास विस्मरणात घालविण्यासाठी पुरेशी होती ! गडावरील हे भयाण दृश्य मनाला यातना पोहोचविणारे होते. आजपर्यंत आपले याकडे दुर्लक्ष कसे झाले, याचीच खंत वाटू लागली. 

या भेटीनंतर दि. ०७ डिसेंबर २०२२ रोजी मी जिल्हा प्रशासनासोबत बैठक बोलाविली. या बैठकीस जिल्हाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विशाळगड मुक्तीसाठी लढा देणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच गडावर अतिक्रमण केलेले स्थानिक उपस्थित होते. गडावर बेसुमार अतिक्रमण आहे हे सर्वांनीच मान्य केले. जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणधारकांना गडावरील त्यांची अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासाठी कालमर्यादा दिली. या कालमर्यादेत त्यांनी त्यांची अतिक्रमणे स्वतःहून काढून न घेतल्यास जिल्हा प्रशासन पुढील तीन महिन्यांत संपूर्ण गड अतिक्रमण मुक्त करेल, अशी ग्वाही या बैठकीत दिली. तसेच, या बैठकीचे फलित म्हणजे गडावर पशूपक्षी हत्याबंदी लागू करून काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. या दिवशीच संध्याकाळी धडक कार्यवाही करत गड पायथ्याला असलेल्या वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात देखील झाली. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून दुसऱ्याच दिवशी ही कार्यवाही बंद पाडली. अतिक्रमण धारकांना त्यांची अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासाठी प्रशासनाने जी कालमर्यादा दिली होती, त्यामध्ये अतिक्रमणे मान्य असून सुद्धा ती काढून न घेता त्यांनी न्यायालयात धाव घेतली. स्थानिक लोकप्रतिनिधीचे या सर्वांना आतून पाठबळ होते व प्रशासनावर दबाव होता. जिल्हा प्रशासन बाजू मांडण्यास कमी पडले. साहजिकच न्यायालयाने अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती दिली. राजकीय दबावामुळे प्रशासनाने या याचिकेचा पाठपुरावाच केला नाही. परिणामी न्यायप्रविष्ठ विषय आहे या गोंडस नावाखाली दीड वर्षे भिजत घोंगडे राहिले. 

पुन्हा एकदा शिवभक्तांचा आक्रोश वाढू लागला. माहे जून २०२४ च्या अखेरीस विशाळगडमध्ये लक्ष घालण्यासाठी माझ्यावर पत्र, ईमेल्स, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमांतून भडिमार होऊ लागला. त्यामुळे पुन्हा एकदा या विषयात लक्ष घालून मी न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा अभ्यास केला. मोठी बाब निदर्शनास आली. न्यायालयाने केवळ सहा अतिक्रमणे काढण्यास स्थगिती दिली होती. प्रशासनाने दिशाभूल करत सर्वच अतिक्रमणांकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले होते. या दुर्लक्षास आणि न्यायप्रविष्ट विषय आहे हे भासाविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधीचा दबाव कारणीभूत होता, हे जगजाहीर झाले. यामुळे शिवभक्तांचा दबाव वाढवून न्यायप्रविष्ठ असलेली सहा अतिक्रमणे वगळता इतर सर्व अतिक्रमणे हटविली जावीत यासाठी ०७ जुलै २०२४ रोजी मी कोल्हापूर येथे शिवभक्तांची बैठक बोलावली. १२ जुलै १६६० रोजी किल्ले पन्हाळगडचा वेढा भेदून छत्रपती शिवाजी महाराज १३ जुलै रोजी विशाळगडवर पोहोचले होते. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून १३ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी विशाळगडावर जाण्याचे निश्चित झाले. मात्र पुढे राज्यभरातील शिवभक्तांनीच मागणी केल्याने सर्वांच्या सोयीकरिता रविवारचा दिवस म्हणून १३ ऐवजी १४ जुलै ही तारीख ठरविण्यात आली. दरम्यानच्या सात दिवसांत प्रशासन अतिक्रमणे काढण्याचा ठोस निर्णय घेईल, असे वाटत होते. मात्र, बैठक लावण्याव्यतिरिक्त प्रशासनाने काहीही केले नाही. बैठकीत काहीच निष्पन्न होणार नाही, याची पूर्ण कल्पना व पूर्वानुभव असल्याने आणि ठोस निर्णय अपेक्षित असल्याने आम्ही या बैठकीवर जाहीर बहिष्कार टाकला. 

प्रशासनाने निराशा केली. आम्ही विशाळगडावर जाऊ नये यासाठी कोल्हापूरच्या खासदारांमार्फत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, अशी कोणतीही बैठक झाली नाही. 

१४ जुलै रोजी आम्ही विशाळगडाकडे निघालो. साधारणतः एक वाजता गडाच्या तीन किलोमीटर अलीकडील गजापूर येथून आम्ही गडाच्या दिशेने चालत निघालो. वाटेत काही घरांची व वाहनांची तोडफोड झाल्याचे दिसले. पोलिसांकडे चौकशी करताच समजले की सकाळीच मोठ्या जमावाने ही तोडफोड केलेली आहे. अधिक चौकशी केल्यावर समजले की सकाळी काही शिवभक्त गडावर गेले होते, त्यावेळी गडावरील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. जखमी अवस्थेत खाली आलेल्या शिवभक्तांना पाहून चिडलेल्या जमावाने गडाखाली असलेल्या वाडीत तोडफोड केली, असे आम्हाला सांगण्यात आले. यावेळी या वाडीतील स्थानिकांना काही हानी पोहोचली नसून कालच सर्व लोकांना इतरत्र हलविले असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

तिथून आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. पायथ्याशी असणाऱ्या पुलावर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला रोखले. सकाळी घडलेल्या प्रकरणानंतर दक्षता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की, मुख्यमंत्र्यांशी बोलून ठोस निर्णय घेऊ, आपण आत्ता गडावर जाणे टाळावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही देखील गडावर जाण्याचा हट्ट टाळला. मात्र, या बदल्यात उद्यापासून विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यास सुरुवात करावी, असा शब्द मागितला. सर्व शिवभक्तांना संयम ठेवून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची वाट पाहण्याचे आवाहन केले. जवळपास तीन तास मुसळधार पावसात आम्ही सर्व शिवभक्तांसह गडपायथ्याला थांबून राहिलो. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. शेवटी शिवभक्तांच्या दबावापुढे सरकार व प्रशासन नमले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यापासून विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. 

स्वराज्याची शौर्यगाथा सांगणाऱ्या विशाळगडाला अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करणे हेच आमचे ध्येय होते, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून आणि सकाळी घडलेल्या प्रकरणानंतर दक्षता म्हणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही गडपायथ्याला थांबूनच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आणि माघारी निघालो. स्वतः जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख या घटनाक्रमाचे साक्षीदार आहेत. 

दुसऱ्यादिवशी पासून राजकारणी मंडळी या विषयात राजकारण शोधू लागली. आपले अस्तित्त्व दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाला. काहीजण शिवभक्तांना दोष देऊ लागले. पण ज्या अतिक्रमण करणाऱ्यांमुळे हे सर्व घडले ते मात्र यांना निर्दोष वाटू लागले. कायदा हातात घेणाऱ्यांचे समर्थन मुळीच नाही पण अतिक्रमण करून कायदा मोडणाऱ्यांचे समर्थन कसे होऊ शकते ? कायदा मोडणाऱ्यांना कोणती शिक्षा आहे ? कायद्यानुसार अतिक्रमण काढा म्हणतात मग अतिक्रमण करताना कायदा आठवला नाही का ? गडावर बेसुमार अतिक्रमण होते, हे अतिक्रमण करणाऱ्यांसह सर्वांनाच मान्य आहे, मग प्रशासनाने दिलेल्या वेळेत स्वतःहून अतिक्रमण का काढून घेतले नाही ? ज्या नेत्यांना वाटते की कायदेशीरपणे अतिक्रमण काढले पाहिजे त्या नेत्यांनी आधीच गडावर जाऊन अतिक्रमण करणे हे बेकायदेशीर आहे आणि स्वतःहून ते काढून घ्यावे, असे प्रबोधन का केले नाही ? अतिक्रमण करून विशाळगड सारख्या ऐतिहासिक स्मारकाचे, देशाच्या इतिहासाचे नुकसान करणे हा गुन्हा नाही का ? हे प्रश्न या राजकारण्यांनी स्वतःला विचारून पहावेत. अतिक्रमण धारकांचा ज्यांना कळवळा येत आहे ते लोक गडावर शिवभक्तांवर झालेल्या हल्ल्याचा साधा उल्लेखही करत नाहीत, याचे वाईट वाटते. तसेच, स्थानिकांना आदल्या दिवशीच प्रशासनाने इतरत्र हलविले असताना आत्ता स्थानिक लोक शिवभक्तांवर जे आरोप करत आहेत, त्यामध्ये किती तथ्य असू शकते याचा वाचकांनीच विचार करावा.

हा विषय विशाळगडवरील अतिक्रमण पुरता मर्यादित आहे. याचे जे पडसाद उमटले त्याबाबत प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल. याला धार्मिक रंग देऊन राजकारण साधण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, तसेच असा प्रयत्न करणाऱ्यांना सुज्ञ जनतेने थारा देऊ नये, या अपेक्षेनेच हा लेखनप्रपंच !"

संबंधित लेख

मनोहर भरमा नांगरे यांचे मरणोत्तर नेत्रदान

महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश

महावितरण चे कार्यकारी अभियंता अँटी करप्शनच्या जाळ्यात

रविवारी 18 मे रोजी अलमट्टी उंचीवाढ विरोधी "चक्काजाम आंदोलन"

सर्कीट बेंच साठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार- आ. सतेज पाटील

राजर्षी छत्रपती शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचारिकादिन साजरा

कार्यकारी संचालक असणार पंचगंगा कारखान्याचा कारभारी: कारखान्यावर प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार

कार्यकारी संचालक असणार पंचगंगा कारखान्याचा कारभारी: कारखान्यावर प्रशासक नियुक्तीला न्यायालयाचा नकार

महापालिकेच्यावतीने भगवान गौतम बुध्द जयंती साजरी

भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी ९ जूनपासून सुरू

वाघाच्या हल्ल्यात तीन महिला ठार, तर एक महिला जखमी

मोटारसायकल अपघातात तबला वादक शिक्षक ठार

अलमटृी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात अंकलीपुलाजवळ सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन.....

कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला सुरवात; राजगड, पन्हाळा, रायगड, विशाळगड संघ विजयी

मलतवाडी इथं कारवाई करत बनावट मद्यसाठ्यासह सुमारे तीन लाख चौदा हजारांचा मुद्देमाल जप्त

प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांचं निधन

पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतीय लष्कराचं जशास तसं उत्तर

कंत्राटी वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

जि.प. अंतर्गत सेवेत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रदद्; मुख्यालयी उपस्थित राहण्याच्या सूचना

पाकिस्तानच्या हल्ल्यात राजौरीच्या अतिरिक्त जिल्हा आयुक्तांचा मृत्यू

पाकिस्तानवरील हल्ल्यावरून 'ऑपरेशन सिंदूर' पोस्टर रिलीज

गगनबावड्यात गोवा बनावटीची दारू जप्त, दोघेजण ताब्यात : गगनबावडा पोलिसांची कारवाई

शियेत बालसंस्कार शिबीर, वारकरी संमेलनाचे आयोजन; मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थ

ऑपरेशन सिंदूर - भारताचा पाकिस्तान वर 9 ठिकाणी हवाई हल्ला

राज्यात १६ ठिकाणी मॉक सिक्युरिटी ड्रिलचे आयोजन

राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या जातीय जनगणनेबाबत पंतप्रधानांना तीन सूचना

बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील वेश्या व्यवसाय सुरू असणाऱ्या यात्री निवास वर कारवाई

लोकशाहीच्या पुन:र्स्थापनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय :आमदार सतेज पाटील

टॅग्स


प्रशासकीय राजकीय धार्मिक कृषी क्राईम अपघात न्यायालय क्रीडा शैक्षणिक साहित्य मनोरंजन पर्यटन आरोग्य सहकार आंदोलन आरक्षण हवामान सामाजिक राज्य राष्ट्रीय इतर अर्थ उद्योग

व्हिडिओ