सप्टेंबरच्या ‘या’ तारखेपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार..?
04 August 2024, 12:04:43 PM
Share
मुंबई – महाराष्ट्रात सप्टेंबरच्या २० तारखेपासून विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार असल्याची शक्यता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलीय. ते सोलापुरात माध्यमांशी बोलत होते. आचारसंहितेपूर्वी जनतेची सर्व कामे करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय. त्यानुसार आता सर्व पक्षांच्या हालचालींना वेग येवू लागलाय.